अहमदनगर बातम्याअहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील ही १८२ गावे होणार जलसमृद्ध; हा प्रकल्प मंजूर

अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील ही १८२ गावे होणार जलसमृद्ध; हा प्रकल्प मंजूर

spot_img
spot_img

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी ५ हजार १७७ कोटी ३८ लाख रुपयांची सुधारित मंजुरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा थेट फायदा ६८ हजार हेक्टर क्षेत्राला होणार आहे.
प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरच्या बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून ते धरणापासून सुरू होऊन धरणापासून ८५ किमी लांब आहे. नदीच्या उजव्या काठाकडे जाणारा कालवा ९७ कि.मी. आहे. या दोन्ही कालव्यांमुळे ६८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण बांधकाम २०२७ पर्यंत पूर्ण होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अवर्षणप्रर्वण भागातील १८२ गावांना सिंचनाचा लाभ होईल.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात